अभंग लिहिण्याचा उद्देश अभंग लिहिण्याचा उद्देश ।नाही दुजा, देव साक्ष ॥मन गुंगे त्याचे ध्यानी ।वेड लागले म्हणूनी ॥प्रीय वाटे ऐसी भक्ति ।सर्व अंगे लीन होती ॥तुकड्या म्हणे तत्व दुजे ।आम्ही न बोलो सहजे ॥